कृषीवार्ता

निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रजन्यवृष्टी. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. प्रमाणात नुकसान.

कांदा टमाटा सोयाबीन मका सर्व पाण्यात. नुकसान भरपाईची मागणी.

नितीन केदार प्रतिनिधी नाशिक जन्मत कालपासून चालू असलेली अतिवृष्टी पाऊस नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील बोकडदरे या गावांमध्ये अति प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या हाताशी तोंडाशी आलेला घास हा पूर्णपणे आता पावसाने पूर्णपणे भिजून गेले आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी हा पावसामुळे संकटात आला आहे पण कालच्या पावसाने अजूनच शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणात संकट उभे राहिले आहे पूर्ण शेतीला तळ्याची स्वरूप आल्याने शेतकरी हा पूर्ण हवालदिन झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना आधीच शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच चिंतेत होता त्यातच दुसरे मोठे संकट उभे राहिले शेतकऱ्यांची सोयाबीन मका कांदे बाजरी टमाटे आधी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्हा प्रशासनाने ताबडतोब नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून सना सुदीच्या दिवसात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे