डिवाइडरला व विद्युत खांबाला धडक.
प्रतिनिधी ।नाशिक जनमत.
नासिक नाशिक सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे अनेक रस्ते खराब झालेले आहे. नासिक मुंबई महामार्ग देखील अनेक ठिकाणी खड्ड्याच्या चर्चेत आला आहे. पाऊस झाला की या खड्ड्यांमध्ये पाणी भरते. उघडला आणखी मोठा दिसून येत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. काल अशाच प्रकारे एक अपघात घडला. मुंबई-आग्रा महामार्गावर लेखानगर भागात बुधवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता भरधाव कारचा भीषण अपघात झाला. महामार्गावर पाणी साचलेले असल्याने निसरड्या रस्त्यावर ब्रेक मारल्याने ही कार घसरली आणि अनियंत्रित होऊन गोल फिरत रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर आदळून दुभाजकांवर जाऊन अडकली. अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर पाणी साचल्यामुळे रस्ता निसरडा झ
द्वारका सिंगलच्या दिशेने जात असलेल्या कारचालकाने साचलेले पाणी पाहून ब्रेक मारताच कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने घसरत जाऊन विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून समोरील भाग चक्काचूर झाला आहे.
अपघातानंतर २० ते २५ मिनिटे वाहतूक खोळंबली होती. पोलिसांसह महामार्ग प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी अंबड पोलिसांत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जखमी चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.