आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण प्रेमींचा मुख्य वन अधिकाऱ्यांशी संवाद.

पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण प्रेमींचा मुख्य वन अधिकाऱ्यांशी संवाद

 

नाशिकच्या विविध पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन मुख्य वनसंवर्धक श्री ऋषिकेश रंजन यांची भेट घेतली . नासिक मधील पर्यावरण विषयी विविध विषयांवर सुसंवाद साधला. ब्रह्मगिरी येथील अवैध खणन, अंजनेरी येथे होणारा रोपवे ,अवैध होणारी वृक्षतोड व नवीन ठिकाणी देशी झाडांची लागवड अशा विविध विषयांवर पर्यावरण प्रेमींनी आपले विचार मांडले .

या मध्ये गिव्ह फाउंडेशन श्री रमेश अय्यर , तुषार गायकवाड, गरुड झेप प्रतिष्ठानचे डॉक्टर संदीप भानोसे , मानव उत्थान मंच चे जगविर सिंग , भारती जाधव ,मनीष बाविस्कर ,राह फाउंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सर्वांनी केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या वनसंरक्षण दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शविला व जनजागरण करण्याकरता स्वाक्षरी मोहीम राबविली .

केंद्र सरकारतर्फे वनसंरक्षण दुरुस्ती विधेयक मानण्यात येणार आहे .यात नैसर्गिक जैवविविधता ,जंगलातील व्यापारी करण्यासाठी औद्योगीकरण यावर भर असल्याचा दावा सर्व पर्यावरण प्रेमींनी केला आहे . आणि म्हणून त्याला विरोध करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे