संजीवनगरात वर्चस्ववादातून तोडफोड, पाच संशयित ताब्यात.
संजीवनगरात वर्चस्ववादातून तोडफोड, पाच संशयित ताब्यात
प्रतिनिधी नाशिक जन्मत लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत असून नाशिक शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. लहान मोठ्या गुन्हे गाराच्या टोळ्या डोके वर काढत आहे. गाड्या फोडणे. परिसरामध्ये वर्चस्व दाखवणे या घटना नेहमी च्या झाल्या आहे.
|
अंबड सातपूर लिंक रोडवरीलसंजीवनगरात वर्चस्ववादातून तोडफोड
प्रकरणात टोळीयुद्धाची किनार समोर आली असून वर्चस्ववादातून वाहनांची तोडफोड केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चुंचाळे अंबड एमआयडीसी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितांच्या विरोधात जिवे मारण्याच्या प्रयत्नासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीप्रमुखाला अटक करण्यात आली असून तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मोहम्मद फैसल वाहिद शेख (रा. संजीवनगर) याच्या तक्रारीनुसार, जलकुंभाजवळून पायी जात असताना चार दुचाकीवरून १० ते १२ संशयित मुले ओरडत हातात कोयते, चाकू घेऊन आले व अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेख यांच्या कान कापला गेला. पाठीवर वार करत गंभीर दुखापत केली. रस्त्याने
टोळीयुद्धाचा भडका
(शेख आणि कांबळे पूर्वी एकाच टोळीत सक्रिय होते. टोळीमधील इतर सदस्यांमध्ये वाद होऊन फूट पडल्यानंतर कांवळे व शेख या दोघांनी स्वतंत्र टोळी तयार केली. या टोळीची परिसरात दहशत निर्माण व्हावी याकरिता कांबळे टोळीकडून ही तोडफोड झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.)
जाणारा अमरुल शेख याच्यावर टोळक्याने हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. साईरुद्रा अपार्टमेंटमधील दोन कारची तोडफोड करत दहशत निर्माण केली. पथकाने संशयित शंकर मुकेश कांबळे (रा. मोरवाडी) याच्यासह पाच संशयितांना ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे तपास करत आहे.
संजीवनगरातील नागरिकांनी याप्रकरणी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची पोलिसांकडे केली आहे. मागणी