सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण बाबा जाधव यांची स्वराज्य पक्षाच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण बाबा जाधव यांची स्वराज्य पक्षाच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
नाशिक जनमत लक्ष्मण सोनवणे इगतपुरी ( प्रतिनिधी ) शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष तथा वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष नारायण बाबा जाधव यांची स्वराज्य पक्षाच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख करण गायकर यांनी नियुक्ती केली. योग्य व्यक्तीची सार्थ निवड झाल्याने शेतकऱ्यांसह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
तालुक्यात कोणत्याही गावात शेतकऱ्यांचे जमिनीचे वाद, भांडण तंटा वा इतर समस्या असो त्या गावातच मिटविण्याचा प्रयत्न करणारे श्री जाधव यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. घोटीवाडी येथील शेतकरी कुटुंबातील तसेच वारकरी सांप्रदायिक असलेले बाबा लहान थोरांना बरोबर घेऊन चालणारे आहेत. अनेक सामाजिक कामांनी नारायण बाबांनी तालुक्यात नाव उंचावल्याचे दिसते आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना स्वराज्य पक्षाने व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असून त्याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. कोर्ट कचेरी कामांमध्ये सर्वसामान्य व्यक्तींचा वेळ खर्च होतो. आर्थिक खर्चही याला आळा घालण्यासाठी घरगुती वाद, जमिनीचे वाद आपापसात कसे मिटतील यावर त्यांचा नेहमी भर असतो. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात याची जाणीव ठेवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम बाबांनी केले आहे.
तालुक्यात भाताला हमीभाव मिळण्यासाठी देखील नारायण बाबा मोठे प्रयत्न केले आहेत. मराठा समाजामध्ये अनाठायी खर्चाना फाटा देऊन फेटे, टॉवेल, टोपी बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसते. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी नारायण बाबा जाधव प्रामाणिक काम करू शकतात असे मत शेतकऱ्यानी व्यक्त केले.