चारीधाम यात्रेला जाणाऱ्या व्यापाऱ्याचा नाशिक रोडला रेल्वे चढताना मृत्यू

चारीधाम यात्रेला जाणाऱ्या व्यापाऱ्याचा नाशिकरोडला रेल्वे पकडताना मृत्यू.
नाशिक जनमत कल्याण वरून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या व्यापाऱ्याचा प्रवास चालू करून अवघ्या तीन तासात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.नाशिकरोड स्थानकावर पाण्याची बाटली घेण्यासाठी खाली उतरलेल्या एका व्यापाऱ्याचा चालत्या गाडीत चढताना हात निसटून खाली पडल्याने मृत्यू झाला. मुंबईहून कुटुंबातील १८ सदस्यांसह हरिद्वार एक्स्प्रेसने देवदर्शनासाठी जात असताना अवघ्या तीन तासांतच ही दुर्घटना घडली. हरेश खेमचंद उदासी (५५) असे मृत
व्यापाऱ्याचे नाव असून ते कल्याण येथे व्यापारी होते. पत्नी मेनका (४९), मुलगा हिरेन (२१) तसेच नातेवाइकांसह सोमवारी सकाळी आठ वाजता कल्याणहून बसले होते. सकाळी ११ वाजता नाशिकरोडला प्लॅटफॉर्म दोनवर हरेश खाली उतरले होते. गाडी सुरू झाल्यानंतर ती पकडताना पडल्याने डोक्याला जबर मार बसून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्री करून मध्ये शोक व्यक्त करण्यात आला.