ब्रेकिंग

वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी मखमला बाद परिसरात दोन महिलांच्या सोन्याच्या पोती घेचल्या. पोलिसांची गस्त कमी असल्याने नाराजी.

मखमलाबादमध्ये संध्याकाळी अर्ध्या तासाच्या अंतरात दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला. पोलिसांची गस्त कमी.

 

प्रतिनिधी । नाशिक जनमत गेल्या एक दीड महिन्यामध्ये मसरूळ पंचवटी मखमलाबाद  परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडी चोरी सोनसाखळ्या चोरण्याचे प्रमाण वाढले आहे पोलिसांची गस्त कमी पडत असल्याचे बोलल्या जात आहे

काल वटसावित्री पौर्णिमा होती. त्यामुळे महिला वर्गांमध्ये आनंदी वातावरण होते दरम्यान संध्याकाळी

मखमलबादा परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना सुरुच असून सायंकाळी पावणे आठ  ते ८.१० या 25  मिनिटांच्या कालावधीत दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यात आले. रॉयल टाउन आणि शांतीनगर येथे पाठोपाठ हे दोन प्रकार घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

किरण शेट्टी (रा. रॉयल टाऊन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या सायंकाळी ७.५० वाजता भा

 

(नवीन कॉलनी परिसरात घरफोडी, चोरी, वाहन चोरी, सोनसाखळी लुट, लुटमारीचे गंभीर गुन्हे वाढले आहे. पोलिसांची गस्त होत नसल्याने पोलिसांच्या कामकाजावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.)

 

प्लाझा येथील बेकरीच्या समोर पायी जात असताना दुचाकीवरील दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन खेचून नेली. या घटनेची माहिती पोलिसांना

 

मिळाली नाही तोच अवघ्या २० मिनिटात राजश्री थेटे (रा. शांतीनगर) या पायी जाणाऱ्या महिलेच्या दुचाकीवरील समोरुन येत दुचाकीवरील दोघांनी गळ्यातील ३ तोळे वजनाचे मंगळसूत्र खेचून नेले. पाठोपाठ घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. म्हसरुळ पोलिसांची गस्त होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

 

शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत असून रस्त्याने जाणाऱ्या महिलांना चोरांकडून लक्ष्य केले जात आहे. यावर पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा केली जात आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे