बीसीसीआयच्या मुश्ताक अली ट्रॉफीत सत्यजित बच्छाव व ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीने महाराष्ट्राचा विदर्भावर विजय
:
बीसीसीआयच्या मुश्ताक अली ट्रॉफीत
सत्यजित बच्छाव व ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीने महाराष्ट्राचा विदर्भावर विजय
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी -T-20 – स्पर्धेत विदर्भ संघावरील विजयात महाराष्ट्र संघातर्फे ४ बळी घेत तर ऋतुराज गायकवाड ने शतक झळकावत मोठा वाटा उचलला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयची हि मुश्ताक अली टी-ट्वेंटी -T-20 – स्पर्धा मोहाली येथे होत आहे.
प्रथम फलंदाजी करत विदर्भने २० षटकांत ९ बाद १७७ धावा केल्या . ध्रुव शोरेने सर्वाधिक ६२ धावा केल्या . महाराष्ट्र संघातर्फे सत्यजित बच्छावने सर्वाधिक ४ ( ४ षटके २३ धावात ४ बळी ) , तर प्रशांत सोळंकीने २ बळी घेतले. उत्तरादाखल महाराष्ट्र संघाने ऋतुराज गायकवाडच्या नाबाद १०२ धावांच्या जोरावर १६.१ षटकांत २ बाद १८० धावा करत ८ गडी राखून मोठा विजय मिळवला. केदार जाधवने ४२ धावा केल्या.
महाराष्ट्राचा पुढील सामना : २७ ऑक्टोबर – राजस्थान .