देश-विदेशब्रेकिंग

हर घर तिरंगा मोहीम अस्मिणीय बनवण्यासाठी नागरिकांनी स्वयंपूर्ण स्फूर्ती ने सहभाग घ्यावा.

6 ऑगस्ट 2022

 

*’हर घर तिरंगा’ मोहिम अविस्मरणीय बनविण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा*

 

*: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार*

 

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करावा*

 

नाशिक, दिनांक: 6 ऑगस्ट, 2022 (जिमाका वृत्तसेवा)

भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे अमृत महोत्सवी वर्ष अविस्मरणीय बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर घर तिरंगा’ मोहीम देशात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबाबत आयोजित आढावा बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार दूरदृष्यप्रणालीद्वारे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपजिल्हाधिकारी तथा हर घर तिरंगा मोहिमेचे नोडल अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे आदी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर नाशिक महानगरपालिका आयुक्‍त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे दूरदृष्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतांना देशपातळीवर अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोरपुरूषांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी एकसंघपणे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. जेणेकरून भविष्यकाळातील पिढ्यांना या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून देशभक्तीची प्रेरणा मिळेल. यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची सर्वचस्तरावर प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभात फेरी, विविध स्पर्धांचे आयोजन करावे, प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात याव्यात. ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जाईल यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात यावे, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी दिल्या आहेत.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या दिवसांत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात येणार असल्याने राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान कायम राखण्यासाठी ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी लोकांमध्ये समाज माध्यमांच्या सहाय्याने जनजागृती करण्यात यावी. तसेच जिल्ह्यामध्ये नागरिकांसाठी झेंडे कुठे उपलब्ध आहेत, त्याठिकाणांची माहिती सामान्य नागरिकांना करून देवून त्यांना हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात यावे. जिल्ह्यातील स्वयंसेवी संघटना, दानशूर व्यक्ति, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या माध्यामातून हर घर तिरंगा मोहिमेबाबत प्रचार प्रसिद्धी करून संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील 75 स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र करून त्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन केल्यास ते विद्यार्थ्यांसाठी

प्रेरणादायी व आदर्श ठरू शकते. याचप्रमाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये देखील या मोहिमेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना देखील या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सहभागी करून घेणे आवश्यक आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार, देशाच्या विकासाची कोणतीही योजना लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. याप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना देशाप्रती प्रेम व आदर व्यक्त करण्याची आपल्या सर्वांना ही उत्तम संधी असल्याने हा राष्ट्रीय उत्सव सर्वांनी एकत्र येवून साजरा करावा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी केले आहे.

 

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्हा प्रशासनामार्फत हर घर तिरंगा मोहिमेच्या नियोजनाची माहिती देतांना सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाभरात ही मोहिम राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा, नाशिक महानगरपालिका व मालेगाव महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 12 लाख झेंडे वितरीत करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले असून त्‍यानुसार सर्व संबंधित यंत्रणांना झेंडे वितरीत करण्यात येत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी, बँक, एमआयडीसी तसेच इतर आस्थापनाही याकरिता सहकार्य करत आहेत. शासकीय व स्थानिक पुरवठादार यांच्याकडून तिरंगा खरेदी करून 8 ऑगस्टपर्यंत सर्व ठिकाणी वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी तिरंगा फडकविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या योजनेची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यासाठी सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळांच्या ठिकाणी झेंडा फडकविण्यासोबतच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज रामशेज किल्ल्याच्या ठिकाणी हेरिटेज वॉक कार्यक्रमाचे आयोजन करून त्या कार्याक्रमात स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मानही करण्यात आला आहे.

 

सर्व विभागांशी व शाळांशी समन्वय साधून विद्यार्थांचा सहभाग घेऊन स्वातंत्र्य दिनी प्रभात फेरी काढण्यात येणार आहेत. तसेच स्वातंत्र्य संग्रामातील जी वारसास्थळे आहेत त्याठिकाणी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी सांगितले.

 

याबैठकीत पोलीस आयुक्त, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य यंत्रणा, कृषि विभाग, जिल्हा क्रीडा विभाग यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यासाठी केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना दिली

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे