ममदापूर येथे दलित वस्ती योजनेअंतर्गत स्टेट लाईट योजनेमध्ये भ्रष्टाचार. कामे निकृष्ट दर्जाचे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.वाचले दोन मुलांचे जीव.
नाशिक जनमत दोनच दिवसापूर्वी झालेल्या थोडाशा वादळी पावसामुळे येवला तालुक्यातील ममदापूर येथे लाईटचा खांबा मध्ये करण उतरल्याने दोन बकऱ्या व एक बकरीचे पिल्लू व बकऱ्यांना चारणारी दोन मुले. हे एका लाईटच्या खांबात करट आल्याने खांबास लटकली होती. दरम्यान जवळच काही व्यक्ती असल्याने त्यांनी ताबडतोब प्रसंगावधान राखून मुलांचे व बकऱ्यांचे जीव वाचवले जवळ काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती असा प्रकार ममदापुर गावात घडला. काही दिवसापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गावातील दलित वस्तीत स्टेट लाईट चे काम करण्यात आले परंतु हे
काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले गेल्याचे ागवकर्यांचे म्हणणे आहे. हे काम चांगले नसल्याने ज्या लाईटचे खांब मध्ये करट आले. व मुलांना शॉक बसला गावातील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे याची चौकशी व्हावी यासाठी काल येवला पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांना गावातील नागरिकांच्या सही सह निवेदन देण्यात आले. निकृष्ट दर्जाचे काम करणारे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे यावर मे राजू कचरू वाघ अर्जदार असे म्हणले आहे तसेच शॉक लागलेल्या मुलांन वर आरोग्य खात्यात नोकरी करणाऱ्या आरती शिरसाट यांनी वेळेस उपचार केल्याने मुलांसह बकऱ्यांची देखील जीव वाचले. अशी घटना पुन्हा गावात धरू नये निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांना वर कारवाई व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.