ब्रेकिंग

कावनई किल्ला घटनेत जिवित वा वित्तहानी नाही* *नागरिकांनी घाबरू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*कावनई किल्ला घटनेत जिवित वा वित्तहानी नाही*

*नागरिकांनी घाबरू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

नाशिक, दि. 21(जिमाका वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा वरील काही भाग कोसळला आहे. त्यात कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. इगतपुरीचे तहसीलदार घटना स्थळावर पोहचले आहेत,

 

 

किल्ल्याच्या पायथ्याशी शेतात राहणा-या नागरिकांना गावात सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना आपआपल्या तालुक्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे