तणावमुक्तीचे साधन सकारात्मक विचार – ब्रह्माकुमारी पूनमदिदी नाळेगाव आश्रमशाळेत तणावमुक्त जीवनशैलीवर व्याख्यान

तणावमुक्तीचे साधन सकारात्मक विचार – ब्रह्माकुमारी पूनमदिदी
नाळेगाव आश्रमशाळेत तणावमुक्त जीवनशैलीवर व्याख्यान
नाशिक प्रतिनिधी
ताण-तणावाचे मुख्य कारण नकारात्मक विचार होय. सकारात्मक विचार करण्याची सवय जर आपण लावून घेतली तर कुठल्याही परिस्थितीत तणाव निर्माण होणार नाही. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असाल त्यात यश प्राप्ती होईल,असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनमदीदी यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत “राजयोग- तणावमुक्त व सकारात्मक जीवनशैली” या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलत त्या होत्या.यावेळी व्यासपीठावर बीके.डॉ. राजेश जावळे,बीके. मोहन राऊतसर,विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश चोपळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ब्रह्माकुमारी पूनम दीदी म्हणाल्या की प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या अध्यात्मिक ज्ञानाद्वारे ताण तणावापासून मुक्ती मिळते.व्यक्ती जीवन अतिशय सुखकर शांतीमय जगू शकतो.तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच वेळेचे महत्व आणि दिव्य गुणांची जोपासना केली पाहिजेत हे अतिशय सोप्या भाषेत व विविध उदाहरण दाखल्यांद्वारे समजून सांगितले.यावेळी डॉ राजेश जावळे यांनी आपल्या मनोगतात भविष्यात मनशांतीची प्रत्येकाला आवश्यकता असून त्यासाठी विद्यार्थी जीवनापासूनच सकारात्मक जीवनशैलीचा अभ्यास करणे आवश्यक आहे विविध उदाहरणांद्वारे स्वस्त मन व स्वस्त तन यांचे महत्त्व विशद करून सांगितले.यावेळी बीके.मोहन राऊतसर यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षांबाबत कुठलाही ताण तणाव न घेता अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी प्रारंभी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जोपळे तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. कोटकरमॅडम यांनी केले.यावेळी ब्रह्माकुमारी पूनमदीदी यांनी ब्रह्माकुमारी संस्थेची सन २०२३ ची दिनदर्शिका सर्व शिक्षकांना भेट दिली.यावेळी शाळेचे सर्व निरीक्षक निरीक्षक शिक्षकाकडून तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————
फोटो कॅप्शन :-
दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव येथील आश्रमशाळेत तणावमुक्त सकारात्मक जीवनशैलीवर मार्गदर्शन करताना ब्रह्मकुमारी पूनमदिदी