ब्रेकिंग

रस्त्यावरील खड्डे व टोल बाबत राज ठाकरे आक्रमक.

♦नाशिक जनमत  पावसाळा संपला असता तरी रस्त्यांची दणदणीने अशी अवस्था आहे . खराब रस्त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे हायवे रस्ते आहे की हे  ग्रामीण भागात रस्ते आहे हे समजत नाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टोल आकारले जात आहे त्यात आता टोल देखील काही ठिकाणी वाढवले जात आहे. राज्यातील रस्त्यांची खराब स्थीती, रस्त्यांवर पडलेल्या खड्डे आणि महामार्गांवर लावण्यात येत असलेल्या टोलच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. महामार्गावरील टोल वाढीवर मनसे नेते अविनाश जाधव उपोषण बसले होते. यानंतर राज्य सरकरकडून एक पत्र आले होते, ज्यामध्ये टोलबद्दल सर्व माहिती देण्यात आली होती. दरम्यान यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

राज ठाकरे म्हणाले की, टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे. सगळ्या सरकारने टोलमुक्तीच्या फक्त थापा मारल्या. फडणवीस टोलवरुन धादांत खोटं बोलतात. टोलचा पैसा जातो कुठे? पैसे मिळत असल्याने टोलनाके बंद होणे अशक्य. टोलवाल्यांकडून सरकारला पैसे मिळतात. तसेच सरकार थापा मारणार आपण ऐकत बसायचे. प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभे राहतील. लहान वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू. असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

 

 

 

रस्त्यातील खड्ड्यांचा विषय हा काश्मिरइतका किचकट विषय आहे का? हा विषय इतकी वर्ष का सुटत नाही? रस्त्यातील खड्डे भरण्याची अवाढव्य रकमेची टेंडर्स कशी निघू शकतात? खड्डे भरण्याची टेंडर्स आपल्याकडेच निघतात. बाकी कुठेच घडत नाही. आणि हा विषय जर सरकारला सोडवता येत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू. राज्यात कुणाचे सरकार हेच कळत नाही. असे राज ठाकरे म्हणाले.

 

 

फडणवीसांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर संजय शिरसाटांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

मनसेच्या टोलच्या आंदोलनानंतर त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीचं सरकार होतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी होती. आता काय आहे? हे कोणालाच माहिती नाही. पण त्यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय म्हणालेले, हे काही क्लिपमधून पाहुयात, असं म्हणत राज ठाकरेंनी एक-एक मिनिटांच्या क्लिप भर पत्रकार परिषदेत दाखवल्या. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या टोलनाक्यासंदर्भातील क्लिप दाखवल्या. मनसेनं आंदोलन करुन अधिकृत आणि अनधिकृत असे 67 टोलनाके बंद केले होते. अजित पवार व्हिडीओमध्ये ज्या 44 टोलनाक्यांबाबत बोलत आहेत, ते मनसेनं त्यांच्यावर दबाव टाकून बंद करायला लावले असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे