ब्रेकिंग

गंगापूर धरण 100% भरूनही महानगरपालिका प्रशासनास जल पूजनाचां विसर.

दोनदा सोडले गंगापूर धरणातून पाणी. उन्हाळ्यात पाणी संकट येण्याची नाशिककर यांना भीती

नाशिक जनमत. यावर्षी  दरवर्षीपेक्षा नाशिक जिल्ह्यामध्ये पर्जन्यवृष्टी का कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक धरणे कोरडे आहेत परंतु नाशिककरांचे तहान भागवणारे गंगापूर धरण भरले असून धरणातून दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून गंगापूर धरण भरल्यानंतर महानगरपालिका प्रशासन महापौर नगरसेवक आयुक्त हे गंगापूर धरणातील जल पूजन करत असतात दरम्यान यावर्षी पावसाळा दहा ते बारा दिवस बाकी असून देखील व धरण पूर्ण क्षमतेने भरून देखील महानगरपालिका प्रशासनातर्फे नासिक करांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणा तील पाण्याची जलपूजन करण्याचे महानगरपालिका प्रशासन विसरून गेले की काय असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. पूर्ण क्षमतेने धरन भरले आहे तरी देखील संभाजीनगर जायकवाडी साठी दोनदा पाणी सोडण्यात आले आहे. येणाऱ्या

 

 

उन्हाळ्यामध्ये मराठवाडा जायकवाडी साठी पुन्हा पाणी सोडावे लागले तर नाशिककरांना पाणी कपातीच्या संकटाला समोर जावे लागेल. अशी भीती निर्माण होत आहे नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी खूपच कमी पाऊस झाल्याने पेरणी देखील झालेली नाही तसेच काही गावात तर भर पावसाळ्यात पाण्याचे टॅंकर देखील चालू आहे. सध्या त्र्यंबक इगतपुरी घोटी परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढून धरण भरले आहे. दरम्यान पाटबंधारे खाते महानगरपालिका महानगरपालिका प्रशासन नाशिककरांचे तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात पाणीसाठा शंभर टक्के असून देखील महानगरपालिका आयुक्त याना जलपुर्णाचा विसर पडला की काय असा विचार करू लागले आहे. व दरवर्षाप्रमाणे चालू असलेली परंपरा विसरले की काय असा प्रश्न नाशिककरणा पडला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे