त्र्यंबकेश्वरला झालेला खून. अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नातून.
संशयित युवकास पोलिसांनी केली अटक.
अतिप्रसंगातून महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न

प्रतिनिधी
|
नाशिक जन्मत
चार दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मध्ये एका महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार उघडीस आला होता. त्र्यंबक पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.
भंगार गोळा करणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा खून अतिप्रसंगाच्या प्रयत्नातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्र्यंबक पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली. पांडुरंग देवराम भगरे (रा. सामुंडी, हल्ली रा. त्र्यंबकेश्वर) असे या संशयिताचे नाव आहे.
–
–
याबाबत वरिष्ठ निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी माहिती दिली की, २४ डिसेंबरला सकाळी त्र्यंबकमध्ये दगडाने ठेचलेला महिलेचा मृतदेह आढळला होता. पथकाने घटनास्थळावरील कपड्यांच्या आधारे महिलेची ओळख पटवली. तपासात ती चांगुना भगरे हिच्यासोबत
संशयिताने महिलेसोबत शारीरिक संबंधाचा आग्रह धरला. महिलेने नकार दिल्याने भगरेने झोपेत असतांना तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला.
राहत असल्याचे समजले. या. महिलेची चौकशी केली असता मृत महिलेचे नाव झुनकाबाई सिताराम वाध (५२, रा. ब्राम्हणवाडे) असल्याचे समजले. झुनकाबाईच्या चौकशीत तिचा मुलगा पांडुरंग हा चांगुना भगरेसमवेत भंगार गोळा करत असल्याचे समजले, तीन दिवसांपासून तो बेपत्ता असल्याचे तिने सांगीतले.