कादवा माळुंगी या गावामध्ये कृषी दुतांचे आगमन.

नासिक जनमत प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय चाचडगाव, नाशिक येथील कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षातील कृषीदूतांचे येथे स्वागत करण्यात आले. ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत २ महिने हा कार्यक्रम चालणार आहे.
कृषीदूतांची टीम शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
सदर विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्याअडचणी, शेतकऱ्यांचे जीवनमान, सामाजिक आर्थिक स्तर, साक्षरतेचे प्रमाण, माती परिक्षण, विविध पिकांवरील रोग व किडीचे व्यवस्थापन, हवामान सल्ला, बाजारभाव व आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल माहिती देणार आहेत. यावेळी गावच्या सरपंच सविता गांगुर्डे यांच्यासह ग्रामस्थ कैलास गुंजाळ, सीताराम घोरपडे, विलास घोरपडे, अनिल कापसे, राहुल दवांगे उपस्थित होते. कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेवटच्या चार आठवड्यांमध्ये विद्यार्थी कृषी आधारित व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. बापुसाहेब द भाकरे, कार्यक्रम अधिकारी प्रो. सुधीर शिंदे व समन्वयक प्रा. श्वेता सातपुते आणि इतर तज्ञांचे मार्गदर्शन लागणार असण्याची माहिती कृषीदूत दर्शन सानप यांनी दिली. या
कार्यक्रमांतर्गत कृषीदूत म्हणून अथर्व सलादे, पुष्कराज सातभाई, रामेश्वर शेळके,
आदित्य शिंदे, यश शिंदे आदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.